Posts

गुणवत्तापूर्ण शिक्षण

देशातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या शिक्षकांनी त्या दिशेने स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल घडविणे महत्त्वाचे आहे.आज शिक्षणामध्ये नवनवीन बदल येत आहेत.अनेक कृतीशील शिक्षक आपल्या कल्पकतेने या बदलांना सामोरे जात आहेत. तसेच आपल्या सृजनशक्तीने शिक्षणामध्ये आनंददायी बदल घडवून आणत आहेत. शिक्षणाची प्रक्रियाच मुळात आनंददायी असली तर मूल आपोआप शिक्षणाकडे आकर्षित होईल.मुलांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी होईल.गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास चांगले विद्यार्थी शिकून बाहेर पडतील. यासाठी शिक्षकाने नवनवीन उपाय योजना आखणे अतिशय महत्त्वाचे आहे.नव्याने शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या शिक्षकांसाठी काही गोष्टी पुढे दिलेल्या आहेत.यातील बऱ्याच गोष्टी शिक्षक करत असतात. मात्र शिक्षक कृतीला उजाळा मिळावा या दृष्टीने आपण काही गोष्टी जाणून घेऊ या... १)सर्वप्रथम शिक्षक किंवा बाहेरील कुणी ज्येष्ठ व्यक्ती,पाहुणे वर्गात आल्यावर मुलांना उभे राहून गुड मॉर्निंग टीचर,गुड मॉर्निंग सर असे म्हणण्याची सवय लावावी. २) मुलांना विशिष्ट अंतरावर शि...

माझे पहिले भाषण

  * माझे पहिले भाषण * किरण दशमुखे,सटाणा माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने आणि ज्या गावाला बदली त्याच गावात राहायचे असे त्यांचे धोरण असल्याने माझे संपूर्ण शालेय शिक्षण खेडेगावातच झाले. तेथे अर्थातच सुविधांची वानवा होती. मात्र तरीही शाळेत महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त शिक्षक मला भाषण करायला सांगत. कधीकधी शिक्षकांच्या घरी जाऊन मी कागदावर भाषण लिहून ते पाठ करून दुसऱ्या दिवशी शाळेत, वर्गात मुलांसमोर बोलून दाखवत असे. मात्र हे सर्व शाळे पुरताच मर्यादित होते. माझ्या भाषणाची खरी सुरुवात झाली, त्याची मात्र एक गंमत आहे. साधारण पस्तीस वर्षांपूर्वी आमच्या गावात अण्णा जगताप म्हणून एका तरुण दलित कार्यकर्त्यांने बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरवले. हे गाव तसे दुर्गम भागात असल्याने तालुक्यातून या गावात यायला रस्ता देखील चांगला नव्हता. दिवसातून एक वेळच बस येत होती. तेव्हा या कार्यक्रमाला वक्ता कोणाला बोलवावे हा विचार त्यांच्यापुढे उभा ठाकला होता. मात्र कार्यकर्ते उत्साही होते आणि मागे हटणारे नव्हते. काही तरी नवीन करण्याची त्यांची उमेद ...

एका नव्या क्रांतीची गरज...

 एका नव्या क्रांतीची गरज.. किरण दशमुखे,सटाणा ८ ऑगस्ट हा दिवस देशभर क्रांती दिन म्हणून दरवषी साजरा केला जातो. आपण बघितले असेल क्रांती ही सामान्य माणसांनी केलेली आहे. धनदांडग्या व भरलेल्या पोटांच्या लोकांनी क्रांती केली नाही. देश गुलामीत असताना त्यांनी गोऱ्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वराज्य मिळाले पण सुराज्या चे काय? आज मात्र आपल्याला आपल्याच काळया इंग्रजांविरुद्ध क्रांती करायची गरज आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत.हा आनंद लुटत असताना आपण थोडे इकडे तिकडे देखील पाहिले पाहिजे.आपल्या आजूबाजूला कित्येक गरीब लोक अजूनही हलाखीचे जीवन जगत आहे.त्यांच्या जीवनात अजून दारिद्य्र,अज्ञान,रूढी परंपरा यांचा अंधारच आहे.त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट अजून उगवलीच नाही.काय त्यांच्याही झोपडीत आपल्या वाटचा स्वातंत्र्य सूर्याचा उजेड पेरण्याची गरज आपल्याला वाटत नाही?स्वातंत्र्याचा आनंद काय फक्त आपण एकट्यानेच लुटायचा?स्वातंत्र्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रश्न आहे तो आपण ती तेवढ्या जबा...

ऑनलाइन शिक्षण घेतांना..

 ऑनलाइन शिक्षण घेतांना... किरण दशमुखे,सटाणा(नाशिक) B.Sc.,B.Ed.,M.A.,M.Phil.,D.S.M.   बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळाच्या गतीनुसार माणूस किंवा इतर प्राणी स्वतःमध्ये बदल करीत आला आहे म्हणून ते आज टिकून आहेत. ज्यांनी बदलाचा स्वीकार केला किंवा बदलाला सामोरे गेले ते आपणास प्रगतीपथावर दिसून येत आहेत.ज्यांनी निसर्गाच्या बदलाचा विरोध केला असे प्राणी संपुष्टात आले आहेत. मानव प्राणी हा सर्वात बुद्धिमान असल्याने तो निसर्गाच्या आव्हानाला योग्य प्रकारे तोंड देण्यास सिद्ध होतो. जगभर कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असल्याने माणसाचे जगणे ठप्प झाले आहे. अनेक जण कोरोनाच्या तडाख्याने मृत्युमुखी पडले आहेत. पण थांबेल तो माणूस कसला! माणसाने आपले व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चालू ठेवले. लाखो बालकांचे शिक्षण थांबले. काही काळ शिक्षणाची चाके थांबली असली तरी ऑनलाइन पद्धतीने पुन्हा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे चालू झाले आहे. ज्यांनी या बदलाचा स्वीकार केला त्यांच्या मुलांमध्ये समाधानकारक प्रगती दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमासाठी अनेक प्रकार सध्या मोबाईलवर उपलब्ध आहेत. त्यातील झूम मीट, गुगल मीट यासार...

सुविचार कशासाठी?

  सुविचार कशासाठी? इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे,"A drop of ink makes millions think." शाईचा एक थेंब लाखो लोकांना विचार करायला लावतो.एवढे लेखनाचे महत्त्व आहे. हजारो पुस्तके वाचून जे मिळणार आहे, ते एका सुविचारातून मिळते.सुविचार हा विचारांचे सार आहे. समुद्रमंथनातून ज्या प्रमाणे अमृत काढावे त्याचप्रमाणे थोरामोठ्यांच्या विचारमंथनातून सुविचार जन्माला येत असतात.सुविचारातून माणूस विचारशील व प्रेरणाशील बनतो.एक विचार माणसाला दिशा दाखवतो. प्रगतीच्या मार्गावर चालायला प्रवृत्त करतो.माणसाचा आचार हा त्याच्या विचारांवर अवलंबून असतो.जसे विचार तसा आचार.आचार म्हणजे आचरण,वर्तणूक.म्हणून चांगल्या आचारासाठी चांगले विचार महत्वाचे आहेत.हे विचार आपल्याला थोरांच्या वाचनातून मिळतात.थोर माणसे काही उगाच मोठी झालेली नसतात.ती आपल्या कार्य कर्तृत्वाने मोठयापदाला पोहोचलेली असतात.त्यांचे जगावेगळे विचार त्यांना येथपर्यंत घेऊन आलेले असतात.या संपूर्ण काळातील त्यांचे अनुभव व यातून आलेले चिंतन म्हणजेच या महान लोकांचे विचार असतात.ते आपल्यासाठी सुविचार बनतात.हेच सुविचार आपण जर अंगिकारले व त्यानुसार आपले आचरण ठेवत गेलो,त...